एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
हेही वाचा… 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले..
आदित्य ठाकरे म्हणाले,, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील असंही ते म्हणाले होते.
हेही वाचा… ईडीचा पवार दाम्पत्याला दिलासा; अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.
Read also
हेही वाचा… अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकारणात खळबळ
हेही वाचा… चंद्रकांतदादांचे काम म्हणजे “गिरे तो भी टांग उपर”, दादा आता तरी जरा दमान घ्या!
हेही वाचा… का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..
हेही वाचा… मोठी बातमी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार