महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. सत्र न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने हसम मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत ईडीने मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिला आहे.
हेही वाचा… मोठी बातमी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार
हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्टाने मंगळवारी फेटळला होता. त्यांच्या जामीन अर्जावर गेल्या चार आठवड्यांपासून सेशन्स कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता. त्यानंतर कोर्टाने मंगळवारी हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा झटका होता. हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला होता. परंतु अटक करण्यास तीन दिवसांची स्थगिती देत मुश्रीफ यांना थोडा दिलासा न्यायालयाने दिला होता.
हेही वाचा… 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार? अजित पवार म्हणाले..
सत्र न्यायालयाच्या निर्णयास हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयावर सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे. तसेच तोपर्यंत मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेशही दिले आहे
Read also
हेही वाचा… ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले?’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकारणात खळबळ
हेही वाचा… चंद्रकांतदादांचे काम म्हणजे “गिरे तो भी टांग उपर”, दादा आता तरी जरा दमान घ्या!
हेही वाचा… का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..