काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मविआतही चांगलीच धूसपूस पाहायला मिळत असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला आहे. ‘राहुल गांधींनी महाराष्ट्रांत पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी’, असा धमकी वजा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.
हैही वाचा… “अजित पवार अस्वस्थ त्यामुळे काहीही होऊ शकतं”; शिंदेंच्या मंत्र्याचे मोठे विधान
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला आहे. राहुल गांधींची अजूनही भूमिका बदललेली नाही, ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही. ते आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळेंनी दिला
Read also
हेही वाचा… काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच ‘मातोश्री’वर..!
हेही वाचा… सचिन वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून मोठा खुलासा…
हेही वाचा… राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देणार?