मुंबई : कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनदरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनच्या नियम कठोर होते, तसेच संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र अशाही स्थिती अनेक नागरिक कामासाठी अथवा काम नसतानाही बाहेर फिरताना आढळल्यावर पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे. pic.twitter.com/UEVyzrUjHp
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 20, 2021
संचारबंदी काळात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. यानुसार, कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे.
Read Also :
- ‘धनंजय मुंडे चौकशीत दोषी आढळले तर…’, शरद पवारांचे स्पष्टीकरण
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांचं आहे थेट नागपूरशी नातं
- ठाकरे सरकारने हटवली होती नारायण राणेंची सुरक्षा, आता केंद्राने घेतला मोठा निर्णय
- ‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’, कर्नाटकच्या मंत्र्याची धमकी
- ‘पुरोगामी पवारसाहेब तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेंना पाठीशी घालणारे असेल; पण…’