मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात देशमुख यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सीबीआय पाठोपाठ आता ईडीने ईसीआयर दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देता देशमुख यांनी हे सर्व राजकीय हेतू पोटी सुरू असल्याचे म्हटले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, मागच्या काळात CBIच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ED च्या माध्यमातून होणार. राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सध्या सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। pic.twitter.com/odOj1uG9AO
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 11, 2021
आपण गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली. तसंच CBIला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्याची मुभा होती. त्यावर निर्णय घेऊन राज्यात सरकारच्या परवानगी शिवाय चौकशी करण्यास बंदी घालण्यात आली. दादरा नगर हवेलीच्या खासदार आत्महत्या प्रकरण मी विधानसभेत मांडलं. त्यामुळे केंद्र सरकार नाराज असू शकते व यामुळेच सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात असावी, असे ते म्हणाले.
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, असे ही देशमुख म्हणाले. दरम्यान, आता ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर नोंदवला आहे. ईडी तपास सुरु करण्यापूर्वी नोंदवलेले पहिले अधिकृत दस्तऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट, जो ECIR म्हणून ओळखला जातो.
Read Also :