मुंबई : नुकत्याच झालेल्या 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामारे जावे लागले होते. आता या पराभवाची समिक्षा करण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
तमिळनाडूचा अपवाद वगळता पश्चिाम बंगाल, केरळ, आसाम व पुदु्च्चेरी या चार राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदरी अपयशच आले. विधानसभा निवडणुकांची समिक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding constitution of group, as mentioned below, to evaluate the results of the recently concluded assembly elections pic.twitter.com/vci6OzpwjO
— INC Sandesh (@INCSandesh) May 11, 2021
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील. ही समिती पुढील 15 दिवसांत आपला अहवाल सादर करेल.
या जबाबदारीबाबत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे आभार मानले असून, निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असे ते म्हणाले.
Read Also :