मुंबई : त्यावेळी आमच्यासोबत असणारे कायदा बनवल्यानंतर श्रेय घेत होते आणि आता फुलप्रुफ नसल्याचे म्हणत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काही मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेले पत्र त्यांच्याकडे सपूर्द केले. भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या काळातील कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांना भेटायला यावं लागलं नसतं, असे ते म्हणाले होते. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते.
… आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो.
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2021
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?
मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते…. आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
Read Also :
- सोयीची उदाहरणं घेऊन बोलण्यपेक्षा, नवाब मलिक यांनी कमी बोलावे
- सामानातले अग्रलेख म्हणजे, “खाली डोकं वर पाय”
- मराठा समाजाच्या आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारची ; नाना पटोले
- मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती, आता मुख्यमंत्री गाठणार थेट दिल्ली
- “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे सोडून दिले