मुंबई : देशात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. एकीकडे महामारीने बाधित रुग्णांचा जीव जात असून दुसरीकडे ऑक्सिजन न मिळाल्याने या आजारातून बरे होत असलेल्या रुग्णांचा हकनाक जीव जात असल्याचे चित्र देशभरात पाहायला मिळत आहे.
यातच गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि उ.प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांमधील लोकांच्या नजरेस, गंगा नदीतून जवळपास ४० ते ५० मृतदेह वाहून येत असल्याचे दिसले असून, उ.प्रदेशातून वाहत येत असलेले हे रुग्ण महामारीने बाधित रुग्णांचे असावेत, असा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे.
यावरून, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर ट्विट करून, “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे गंगेत सोडून दिले”, अशी टीका केली आहे.
यूपी और बिहार से खबरे आ रही है कि वहां शवों को नदी मे प्रवाहित किया जा रहा है। गांवों में हालात बदतर है। यमुना नदी में दर्जनों लाशें दिखी, हमीरपूर, गंगा नदी में कई शव मिलने से हड़कंप मच गया है। ये बता रहा है कि यूपी और बिहार में कोरोना से हालात कितने विस्फोटक है – @nawabmalikncp pic.twitter.com/elLES4PmRV
— NCP (@NCPspeaks) May 11, 2021
तसेच त्यांनी मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधत, उ. प्रदेशात इतकी भयावह परिस्थितीअसताना मात्र मुख्यमंत्री योगी जाहिरातबाजीतून लोकांना सत्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती इतकी भयानक आहे की, अंत्यसंस्कारासाठी लाकडंदेखील शिल्लक नाहीयेत. त्यामुळे नागरिक नाईलाजाने मृतदेहांना थेट नदीत सोडून देत आहेत. खरंच, “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे गंगेत सोडून दिले आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- “पाऊल पडले पुढे”; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र, थोड्याच वेळात राज्यपालांनाही भेटणार
- उजनीचे पाणी पेटले : “आमचं पाणी चोरलंय; पालकमंत्री भरणे हे चोर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत”
- “खोट्या आरोपांवरून हा अनिल देशमुखांचा, राजकीय छळ सुरु आहे”
- अनिल देशमुखांची होणार ईडीकडूनही चौकशी
- एकनाथ खडसे आणि नितीन गडकरींचे झाले एकमत…