मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून यासाठी आघाडी सरकारला जबाबदार धरले जात असून, दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकते असा घोषवारा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
न्यायालयाने हा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजाचा रोष कमी व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असून, जनतेशी संवाद साधताना त्यांनी, मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच तातडीने घ्यावा अशी हात जोडून विनंती केली होती. आता उद्धव ठाकरे हा मुद्दा थेट राष्ट्रपतींच्या पुढ्यात मांडला असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, ते पत्र आज ते राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.
दरम्यान, शहाबानो प्रकरण, ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून जशी संवेदनशीलता आणि न्यायप्रियता दाखवली, तशीच आता ती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Read Also :