मुंबई : अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसून येत असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यानंतर आता, पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत अंमलबजावणी संचलनालयाकडूनही (ईडी) त्यांच्यावर (ईसीआयर)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांवरच्या या कारवाईनंतर काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली असून, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर ट्विट करून निशाणा साधत, “माजी गृहमंत्र्यांच्यावर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे.” असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021
तसेच, “परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे”, असे म्हणत अनेक सवाल त्यांनी मोदी सरकारच्या या कृतीवर उठवले आहेत.
आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021
Read Also :