मुंबई : राज्यात महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, अजूनही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात म्हणावं असं यश राज्य सरकारला येत नाहीये. मात्र, अशा परिस्थितीतही गेल्या काही महिन्यांपासून अनेक मुद्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यातील भाजप नेत्यांना शालेतून जोडे मारले होते.
“सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही. या काळात राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद, जाती आणि धर्मभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील आणि योग्य तो निर्णय देतील,” असा प्रांजळ मोलाचा सल्ला नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांना दिला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गडकरींच्या या सल्ल्यावर भाष्य केले असून, “एखाद्या यंत्रणेवर सातत्याने टीका केल्यामुळे, ती यंत्रणा नाउमेद होते. परिणामी त्याचा प्रशासनावर ताण येतो. त्यामुळे या परिस्थितीत टीका करू नये, असे जो सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे. त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी सांगितले की हीच भूमिका मी देखील सातत्याने मदानात आलो आहे. मी देखील सांगत आहे की या काळात सरकारवर टीका न करता, सर्वांनी एकत्र येऊन सरकारला शक्य तेवढी आणि तितकी मदत आणि सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे आता गडकरींनी सांगितल्यावर आणि पंतप्रधानांनी राज्याचे कौतुक केल्यावर, मला वेगळे अधिक काही बोलण्याची गरज वाट नाही, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.
Read Also :
- परमबीर सिंग यांची एसीबीकडून चौकशी सुरु, चौकशीत तथ्य आढळ्यास…
- आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, काँग्रेस आमदाराविरोधात गुन्हा दाखल
- …. म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यपाल कोश्यारींची भेट
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?