मुंबई : आधी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीचे झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सातत्याने भाजपवर टीका करत असतात. याआधी देखील त्यांनी भाजपमध्ये बाहेरच्या नेत्यांना डावललं जातं असा आरोप केला होता.
कालांतराने नंतर जेव्हा खडसेंच्या नाराजीचा सूर भाजपमधून उमटू लागला तेव्हा देखील त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात मोर्चा वळवला होता. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत, अखेर त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, त्यांनी परत एकदा भाजपवर यावरून हल्लाबोल केला असून, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, मागील काही काळापासून भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना जाणूनबुजून डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी भाजपमध्ये सर्वात जास्त छळ हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा केला गेला असल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे.
Read Also :
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?
- मराठा बांधवांसाठी राज्य सरकार जाणार परत सुप्रीम कोर्टात, दाखल करणार पुनर्विचार याचिका
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी