सोलापूर : राज्यात उजनीचा पाणी प्रश्न अजूनच चिघळला असून, यावरून आज दोन जिल्ह्यांचे शेतकरी थेट जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर एकमेकांशी भिडल्याची घटना घडली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, सोमवारी उजनीच्या पाणीप्रश्नावरून दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांची, जलसिंचन भवनात बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीतून काही तोडगा निघण्याऐवजी, दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी थेट जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोरच एकमेकांशी भिडले. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने लाकडी निंबोळी योजनेला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे, उजनीतील पाच टीएमसी पाणी आता इंदापूरला नेले असल्याची चर्चा सोलापूर जिल्हयात सुरु आहे. याला जिल्ह्यातून प्रचंड विरोध होत असून, दुसरीकडे उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही पाणी मी इंदापूरला नेले आहे, हे सिद्ध करून दाखवले, तर मी मंत्रिपद आणि आमदारकी सोडून राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
Read Also :
- “केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकारचं लसींचा तुटवडा निर्माण करतंय”
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले
- सामनातल्या “त्या” लेखाचा, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून जाहीर निषेध; मुख्यमंत्र्यांना पत्रातून दिला “हा” इशारा
- कोरोना संकटात राजकारण! नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान
- संजय राऊत यांनी आतातरी अपरिपक्वतेतून लिखाण थांबवावे, संजय काकडेंची तिखट टीका