मुंबई : दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून, जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, यावरून राज्यातले मंत्री केंद्र सरकारवर टीका लार्त आहेत. तसेच, राज्याला या मदतींपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप देखील राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील पक्षांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील यावरून, भाजपवर टीका केली होती. टीव्हीवरून समजले की आपल्याला परदेशातून देखील मदत होत आहे. मात्र, यातलं महाराष्ट्राच्या वाटेला अजून तरी काही आलं नाही, असा आरोप त्यांनी केला होता.
त्यांच्या या आरोपाला आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले असून, “नेमका हाच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना विचारावा. कतारमधून वैद्यकीय सामुग्री घेऊन एक जहाज मुंबईत आले होते. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला काय मिळालं, असा जो सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे, तो त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारावा, असा टोला प्रविण दरेकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.
Read Also :
- सुप्रीम कोर्ट सगळे आदेश देत असेल, तर मोदी सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा परखड सवाल
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी
- “केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकारचं लसींचा तुटवडा निर्माण करतंय”