मुंबई : देशात महामारीने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावरून देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात असून, राज्यात असलेल्या सत्ताधारी पक्षांकडून देखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून देखील सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकरला लक्ष्य केले जात असून, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि सध्याच्या आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
देशात सातत्याने वाढत असलेल्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे, देशाला ऑक्सिजन, रेमेडिसिवीर आणि इतर औषधांच्या तुटवड्याचा, तसेच लसींच्या अपुरा पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने १२ सदस्य असलेल्या ‘नॅशनल टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. यावरून थोरात यांनी, महामारीला थोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला ‘नॅशनल टास्क फोर्स’ नेमावी लागत आहे, मग केंद्र सरकार काय करतंय ? असा सवाल त्यांनी केला आहे.
“केवळ आणि केवळ लसीकरणामुळे येणारी तिसरी लाट ही रोखली जाऊ शकते. अनेक मृत्यू थांबवले जाऊ शकतात. नागरिकांचा त्रास कमी केला जाऊ शकतो, पण केंद्र सरकार लस देत नाही. त्यांच्याकडे लसींच्या बाबतीत काही नियोजन नाही. हे केंद्र सरकार नियोजनशून्य आणि निष्क्रिय आहे,” असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- “एकतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे किंवा त्यांनी थेट राजीनामा द्यावा”, मेटेंची आक्रमक मागणी
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?
- मराठा बांधवांसाठी राज्य सरकार जाणार परत सुप्रीम कोर्टात, दाखल करणार पुनर्विचार याचिका
- “नानांनी कचराच करून टाकला…”
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले