मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी प.बंगालमध्ये जोरादार मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी देशात विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पुढे यावं आणि एक भक्कम आघाडी उभी करून, एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष असेल. देशात काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. मात्र, काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे,” अशी टिपण्णी केली.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना समाचार घेतला असून, संजय राऊत जे काही बोलतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. तसेच आम्ही सामना देखील वाचत नाही. संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात, पण कदाचित संजय राऊत यांना याची जाणीव नसावी की, केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, असा सणसणीत टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.
यावेळी त्यांनी, भाजपच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेतृत्वावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच, महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असताना, रात्रंदिवस भाजप फक्त सत्तेचाच विचार करत आहे. जेव्हा एकीकडं लोक चितेवर जळत होते, तेव्हा दुसरीकडे मोदी प्रचारात मश्गुल होते, अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे.
Read Also :
- सामनातल्या “त्या” लेखाचा, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून जाहीर निषेध; मुख्यमंत्र्यांना पत्रातून दिला “हा” इशारा
- ‘खट्याळ मुल देखील थयथयाट करून शांत होतात, याचा इतका थयथयाट कशासाठी?’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’
- संजय राऊत यांनी आतातरी अपरिपक्वतेतून लिखाण थांबवावे, संजय काकडेंची तिखट टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना