मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली. यामुळे एकीकडे मराठा समाज नाराज झाला असून, निकालानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर, विरोधकांनी देखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे देखील प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याआधी त्यांनी, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणी केली होती. तसेच आता त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. राज्याचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आता त्यांनी देखील तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी मेटे यांनी केली आहे.
तसेच, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करताना, “मुख्यमंत्री म्हणतात आम्ही केंद्राच्या पाय पडतो, पण केंद्राचे पाय धरण्याऐवजी त्यांनी त्वरित आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून, तो केंद्राला द्यावा आणि पुढची कारवाई करावी,” या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दुसरीकडे, सोमवारी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं आहे. तसेच, यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा अहवाल पुढील १५ दिवसात येणे अपेक्षित आहे, हा अहवाल आल्यावर याबाबतीत पुढील निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- दरेकरांचा एवढा कसला महाराष्ट्र द्वेष; की त्यांना काय आरोप करावेत याचं देखील भान नाही?
- मराठा बांधवांसाठी राज्य सरकार जाणार परत सुप्रीम कोर्टात, दाखल करणार पुनर्विचार याचिका
- “नानांनी कचराच करून टाकला…”
- “हे तर पाकीटमार आणि खिसेकापू सरकार”, नवाब मलिकांचा मोदी सरकारवर घणाघात
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी