मुंबई : देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल लागून काही दिवस उलटत नाही, तोवर देशात पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढण्यास सुरुवात जाहली आहे. दरम्यान, आता वरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असून, राज्यातून देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, यावरून केंद्र सरकारावर टीका करताना, “केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा सवाल उपस्थित केला आहे.” तसेच, “देशात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात? देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी,” अशी मागणी देखील त्यांनी केंद्राला केली आहे.
केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी @nawabmalikncp यांनी केली आहे.
— NCP (@NCPspeaks) May 10, 2021
तसेच यावेळी त्यांनी, “निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी केले होते, मात्र ही घोषणा केवळ तोंडच्या वाफा असण्याची शंका त्यांनी उपस्थित करत, हा केवळ चुनावी जुमला होता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांनी जनतेला सांगू शकतात. त्यामुळे जी घोषणा केली आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत,” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
यावेळी, “केंद्र सरकारच्या ढिसाळ लसीकरण नियोजनामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना अजूनही दुसरा डोस मिळणे बाकी आहे. अस्ताव्यस्त लस पुरवठा असल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे, असे सांगत,” जबाबदारी स्वीकारल्यानंतर ती पार पाडण्याची क्षमता व नियोजन नसेल तर जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत? अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
Read Also :
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी
- “केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकारचं लसींचा तुटवडा निर्माण करतंय”
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले
- सामनातल्या “त्या” लेखाचा, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून जाहीर निषेध; मुख्यमंत्र्यांना पत्रातून दिला “हा” इशारा
- भारतीय नौदलाची अभिमास्पद कामगिरी: आयएनएस त्रिकंद युद्धनौका तब्ब्ल 27 मेट्रीक टन ऑक्सिजन सहित मुंबईत दाखल