मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली. यामुळे एकीकडे मराठा समाज नाराज झाला असून, निकालानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर, विरोधकांनी देखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली.
दरम्यान, आज यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितलं आहे. तसेच, यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा अहवाल पुढील १५ दिवसात येणे अपेक्षित आहे, हा अहवाल आल्यावर याबाबतीत पुढील निर्णय घेतला जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे, आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत अजून तरी राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, मराठा समाजाचा रोष आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करताना दिसत आहे.
Read Also :
- “नानांनी कचराच करून टाकला…”
- “हे तर पाकीटमार आणि खिसेकापू सरकार”, नवाब मलिकांचा मोदी सरकारवर घणाघात
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी
- “केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकारचं लसींचा तुटवडा निर्माण करतंय”
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले