मुंबई : देशात महामारीने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावरून देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात असून, राज्यात असलेल्या सत्ताधारी पक्षांकडून देखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून देखील सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकरला लक्ष्य केले जात असून, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “जगात भारत एक समृद्ध देश म्हणून उभा राहिला, तो पंडित नेहरूंपासूनच्या काँग्रेस सरकारने केलेल्या विकासकामांमुळे, परंतु दुर्दैवाने गेल्या सात वर्षात देशाच्या या प्रतिमेला काळे फासण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात तर मोदी सरकारने जनतेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून, त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘च’ दिले आहेत, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर केली आहे.
महामारीमुळे देश धगधगत असून, शेवटी सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करत टास्क फोर्सची नेमणूक करावी लागली. दुसरीकडे देशात ऑक्सिजन, रेमेडिसिवीर, लसींचा देखील गोंधळ करून ठेवला आहे, या सगळ्याचा परिणाम म्हणून आज देश हे भोगत आहे. काँग्रेसच्या सरकारच्या काळात देखील आपत्त्या आल्या, मात्र आम्ही कधीही त्यांची झळ नागरिकांपर्यंत पोहोचू दिली नाही. देशाला अश्या संकटांमधून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- सुप्रीम कोर्ट सगळे आदेश देत असेल, तर मोदी सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा परखड सवाल
- “नानांनी कचराच करून टाकला…”
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले
- “आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढणार…”, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
- देशातील जनतेला मरायला सोडलं आहे का?; नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल