मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता येऊन आता दीड वर्ष उलटली आहेत, तरीही आघाडीमधील धुसफूस अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकट होते. मध्यंतरी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर, ‘माझा आजही वेगळे लढण्याबद्दल विचार आहे आणि १०० दिवसांनंतर सुद्धा तोच विचार असणार आहे’, असं वक्तव्य केलं होतं.
तसेच, सध्या उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री तसेच, राष्ट्रवादीचे नेते, आघाडी सरकारमधले मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यातच आता आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पुन्हा एकदा विधानसभा स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे.
आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना, ‘आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला असल्याचे वृत्त दिव्य मराठी या वृत्तपत्राने दिले आहे.
त्यामुळे आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी कोणती समीकरणे पाहायला मिळणार?, प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार?, कोणत्या पक्ष जास्त जागा मिळवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read Also :
- मोदी-शहा पश्चिम बंगालमध्ये का हरले?; संजय राऊत म्हणाले, असं आहे गुपित..
- सीबीआय, एनआयए पाठोपाठ आता एसीबी देखील मागे, परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ
- आदित्यला मंत्रिपद दिलं त्याच तत्परतेने बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल