नागपूर : महाराष्ट्रात कोरोना व्हायरस महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही गेल्या काही दिवसात विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत.
सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील, असा सल्ला नितीन गडकरींना भाजप नेत्यांना दिला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील गडकरींनी प्रेमळ सल्ला दिला. ‘देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा’, असे गडकरी म्हणाले. ते नागपुरमध्ये भाजपच्या बैठकीत बोलत होते.
माझ्यात अँटीबॉडिज तयार आहेत. मला काही होत नाही, अशा फाजिल आत्मविश्वासात राहू नका. आपला प्रत्येक कार्यकर्ता देवदुर्लभ आहे. त्यांना गमावून चालणार नाही. देशकार्य होईल, मात्र आधी स्वत:ची काळजी घ्या, अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
Read Also :
- ‘स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेतील कमतरता दूर करा’
- ‘सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’
- ‘मी कडी लावून घरातच बसणार, तुम्ही मैदानात उतरा अशी ही मानसिकता’
- पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल