पुणे : कोव्हिडच्या संकटासंदर्भात मुख्यमंत्र्यांची तळमळ रोज पाहतो आणि त्यांच्या भाषणातून ती आपल्या प्रत्येक शब्दाशब्दात दिसते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील या परिस्थितीचा जो अभ्यास केला आणि त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे असा अभ्यास जर इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केला असता तर तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात कात्रज परिसरात कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाईफ केअर हॉस्पिटलचे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी हे मत मांडले.
संजय राऊत म्हणाले की, केंद्राने किंवा केंद्रातील आरोग्य विभागाने काय केले माहीत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने ज्या टास्कची निर्मिती केली तो टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे.
इतर राज्यात कोण काय करतोय हे मी आवर्जून पाहत असतो. परंतु, महाराष्ट्रात आपण का व्यवस्थीत काम करू शकतोय कारण शिवसेना म्हणुन सामाजिक जाणिवेची जी मुहूर्तमेढ स्व. बाळासाहेबांनी रोवली ती आज प्रत्येक शिवसैनिक पुढे नेतोय. सरकार समांतर शिवसैनिक कोव्हीड केयर सेंटर निर्माण करतआहे, स्वतः ते चालवताय यामुळे प्रत्येकाला योग्य सेवा उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे सरकारचा ताण कमी होऊन मोठ सहकार्य होत आहे, असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांच्या कार्याची पाठ थोपटली.
Read Also :
- ‘मी कडी लावून घरातच बसणार, तुम्ही मैदानात उतरा अशी ही मानसिकता’
- पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना
- महामारी, तिसरी आघाडी आणि काँग्रेसवर संजय राऊतांचे मोठे भाष्य, म्हणाले…