मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, महाराष्ट्रात सरकारला समांतर अशी यंत्रणा उभी राहत असल्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे, याउलट इतर राज्यांमधील पक्षांना ते जमलं नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
तसेच, ‘महाराष्ट्र मॉडेलचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं. त्याच महाराष्ट्र मॉडेलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं. यावरून महाराष्ट्र या लढाईत पुढे आहे हे दिसतंय. महामारीशी लढताना महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावं लागेल’ असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
यावेळी काँग्रेस पक्षावर भाष्य करताना त्यांनी, “तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी प.बंगालमध्ये जोरादार मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी देशात विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पुढे यावं आणि एक भक्कम आघाडी उभी करून, एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष असेल. देशात काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. मात्र, काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे,” अशी टिपण्णी त्यांनी केली.
दरम्यान, अजूनही कल्पनेत असणाऱ्या या तिसऱ्या आघाडी बद्दल अधिक सविस्तर बोलताना त्यांनी, “जसं महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन मिळून, उद्धव ठाकरे यांना आपला नेता म्हणून स्वीकारलं. अशीच एक आदर्श व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर देखील निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, या विषयावर कालच माझी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील”, असे सूतोवाच संजय राऊत यांनी केलं आहे.
Read Also :
- ‘ही तर राज्य सरकारची त्रिसूत्री, एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती!’, भाजपकडून ठाकरे सरकारवर हल्लबोल
- सचिन सावंतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले ‘मनोरा आमदार निवास’ची किंमत…
- “आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढणार…”, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
- मोदी-शहा पश्चिम बंगालमध्ये का हरले?; संजय राऊत म्हणाले, असं आहे गुपित..
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल