मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थिती सक्षमरित्या हातळल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुक केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून केला जात आहे. मात्र यावरून आता भाजप आणि ठाकरे सरकार आमनेसामने आले आहेत. स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेतील कमतरता दूर करण्याची आवश्यता असल्याचे म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरेकर म्हणाले की, कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुकाचं काही वाटत नाही पण आमचं म्हणणं हेच आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन रेमडेसिविर मिळत नाही.
आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेत ज्या कमतरता आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. पण एखादी पीआर एजन्सी नेमून, बातम्या पेरुन आपलं कोडकौतुक करायचं आता हे बास करा. लोकांना आता समजायला लागलं आहे की तुमच्या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत, असा जोरदार टोला दरेकरांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच आज इथली आरोग्यव्यवस्था टिकून आहे. पण हे केंद्रावर टीका कऱणं थांबवत नाहीत. आम्ही सहकार्य करतो पण या गोष्टी थांबवा. लोकांवर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न माध्यमांच्या साहाय्याने होणार नाही तर तो कृतीतून होणार होईल, असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारच्या कामाचे कौतुक केले होते. यावर बोलताना दरेकर म्हमाले की, आजही कोणत्याही गोष्टीचे ताळमेळ नाही. न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं सुरळीत असतं तर मृत्यू मोठ्या प्रमाणात का होत आहे ? ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिव्हिर मिळत नाही, मग याचे उत्तर काय ? काहीही सुरळीत नसून व्यस्थित अनेक कमतरता आहेत. न्यायालयाने केलेल्या कौतुकाचे आम्हालाही आनंद आहे. पण राजकीय अभिनिवेशाने बोलणे योग्य नाही.
Read Also :
- ‘सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’
- ‘मी कडी लावून घरातच बसणार, तुम्ही मैदानात उतरा अशी ही मानसिकता’
- पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
- फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका