मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आणि प्रामुख्याने अग्रलेखातून सातत्याने केंद्र आणि राज्य पातळीवरच्या भाजप नेत्यांवर आणि त्यांच्या धोरणांवर निशाणा साधलेला असतो. देशातल्या सध्याच्या महामारीच्या परिस्थितीवरूनही सामनातून सातत्याने केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात आहेत, तर राज्यातल्या महामारीच्या परिस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, याच अग्रलेखाचा आज भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी समाचार घेतला असून, “आजच्या सामनामधल्या अग्रलेखाला, “खाली डोकं वर पाय” असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात महामारीचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे?, मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?, असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
तसेच, मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे केंद्रासमोर हात जोडून सातत्याने, लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, १८ वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, अशा मागण्या करत राहायच्या आणि या सर्व गोष्टींचा केंद्राकडून पुरवठा झाल्यानंतरही परत केंद्रालाच दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत असल्याची टीका देखील शेलार यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
Read Also :
- मराठा समाजाच्या आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारची ; नाना पटोले
- मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती, आता मुख्यमंत्री गाठणार थेट दिल्ली
- “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे सोडून दिले
- उजनीचे पाणी पेटले : “आमचं पाणी चोरलंय; पालकमंत्री भरणे हे चोर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत”
- “खोट्या आरोपांवरून हा अनिल देशमुखांचा, राजकीय छळ सुरु आहे”