मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काही मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेले पत्र त्यांच्याकडे सपूर्द केले. यावरून आता भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला अशी ही कृती असून, आघाडी सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यात आल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ध्यानात घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाच्या भरभक्कम शिफारसीसह पुढचे पाऊल टाकायला हवे होते. परंतु, तसे काही न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले आणि मराठा आरक्षणासाठी केंद्राने निर्णय घ्यावा, यासाठी निवेदन दिले. पण असे केवळ निवेदन देऊन राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.
जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला, मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारकडून खेळखंडोबा!! pic.twitter.com/EvQ5GgJamV
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 11, 2021
शिष्टमंडळाने केंद्र सरकारसाठी निवेदन देताना मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस करणारा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सोबत द्यायला हवा होता. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अयोगाचा अहवाल बाजूला ठेवल्यामुळे न्यायालयाने दाखवलेल्या त्रुटी दूर केलेला आणखी भक्कम द्यायला हवा. त्यासाठी राज्यात सर्वप्रथम मागासवर्ग आयोग गठन करावा, असा सल्ला देखील चंद्रकांत पाटलांनी दिला.
ज्या राज्यपालांना सहा महिने शिव्या दिल्या त्या राज्यपालांना नम्रपणे भेटून आज काय साध्य केले. राज्यपालांना भेटणे म्हणजे मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना भेटून काहीच उपयोग नाही, अशी जोरदार टीका देखील त्यांनी केली.
Read Also :