अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारे उद्यापासून (30 जानेवारी) राळेगणसिद्धी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
30 जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांनी केलेल्या अनेक मागण्या अद्याप मान्य न झाल्याने अण्णा हजारेंनी हा निर्णय घेतला आहे.
Social activist Anna Hazare says he will begin a protest over various demands related to farmers in Ralegan Siddhi in Ahmednagar, Maharashtra from January 30; urges supporters to protest at their respective locations. pic.twitter.com/cOXLEnnGEj
— ANI (@ANI) January 28, 2021
कोरोना संसर्गाच्या भितीमुळे कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत गर्दी करू नये, ठिकठिकाणी अहिंसेच्या मार्गाने पाठिंबा देणारी आंदोलने करावीत, असे आवाहन अण्णा हजारेंनी केले आहे.
दरम्यान, अण्णा हजारेंनी आंदोलन करू नये यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच गिरीश महाजन यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. मात्र अण्णा उपोषणावर ठाम असल्याने भाजपच्या या मनधारणीला अपयश आल्याचे दिसत आहे.
Read Also :
- ‘आता एक बाजू निवडण्याची वेळ आलीये’, शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका
- ‘मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा
- कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार
- ‘वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा’, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका