जालना : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपासून वडेट्टीवारांनी ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
जालना येथील का कार्यक्रमात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे असा उल्लेख केल्याचा आरोप करीत घटनात्मक अधिकार नाकारून बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाने केली आहे.
राजीनाम्याच्या मागणीसाठी राठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये जालन्यात ओबीसी समाजाचा महामोर्चा पार पडला. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, अशी मागणी उचलून धरली आहे.
Read Also :
- शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी 23 कोटी मंजूर, आदित्य ठाकरेंची माहिती
- ‘काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही, पवारांनी दिलेली वाट तात्पुरती’
- ‘अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालत नाही, तर…’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- … तर मी आत्महत्या करेन, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा
- ‘तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु, फक्त…’, काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा