नवी दिल्ली : आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलानाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. यानंतर शेतकऱ्यांविरोधात देखील स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
एक साइड चुनने का समय है।
मेरा फ़ैसला साफ़ है। मैं लोकतंत्र के साथ हूँ, मैं किसानों और उनके शांतिपूर्ण आंदोलन के साथ हूँ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2021
शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत असल्याचे म्हणत राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याआधी ट्विट करत त्यांनी अर्थव्यवस्थेवरून देखील मोदी सरकारवर निशाणा साधला.
Mr Modi’s governance is a lesson in how to ruin one of the world’s fastest growing economies.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2021
मोदी यांचा कारभार हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी नष्ट करावीत याचा एक धडा आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
Read Also :
- ‘मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा
- कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार
- ‘वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा’, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका
- शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी 23 कोटी मंजूर, आदित्य ठाकरेंची माहिती