धाराशिव : लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. धाराशिवमध्ये 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यातच रंगणार आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. काल त्यांनी उमरगा तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत धाराशिवच्या विकासासाठी महायुतील साथ देण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान उमरगा तालुक्यातील तुरोरी, कराळी परिसरातील निसर्गरम्य अचलबेट देवस्थान येथे अर्चना पाटील यांनी दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने सत्कार केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने केले..
नारंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेऊन अर्चना पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.. यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेब आणि या भागाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. किल्लारी भूकंप काळात साहेबांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे. पाटबंधारे मंत्री असताना साहेबांनी या भागात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव आणि सिंचनाच्या अनेक योजना राबवून हा भाग सुजलाम सुफलाम केला आहे..
हेही वाचा…“सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा मोदींचा किळसवाणा डाव”, कॉंग्रेसची मोदींवर जहरी टिका
साहेब खासदार असताना या मतदार संघातील ७०% पेक्षा जास्त गावांना खासदार निधी दिलेला आहे. त्यामानाने आजच्या खासदाराने किती निधी दिला हा संशोधनाचा भाग आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद उपाध्यक्षा असताना शाळा, तीर्थक्षेत्र, रस्ते, आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या भागात आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या हक्काच्या महायुतीला साथ द्यावी असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा….“पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची माझी तयारी”
हेही वाचा…ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा