रायगड : अवघ्या आठ दिवसांपुर्वी शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे सुर्यकांत दळवी यांनी एकमेकांवरती टिका केली होती. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या मेळाव्यात उभय नेत्यांना एकत्र आणल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आता मनसेचे नेते वैभव खेडेकर हे देखील मागील सर्व नाराजी विसरून महायुतीच्या उमेदवारासाठी कामाला लागले आहेत.
हेही वाचा…“सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा मोदींचा किळसवाणा डाव”, कॉंग्रेसची मोदींवर जहरी टिका
वैभव खेडेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यात मागील काही वर्षांपासून वाद होता. मात्र मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर वैभव खेडेकर हे देखील आता कामाला लागले आहेत. काल महायुतीचे उमेदवार रायगड लोकसभेचे सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
वैभव खेडेकर म्हणाले की, पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची माझी तयारी आहे. कोकणातून मनसेची वाटचाल ही काचावरून केलेली आहे. त्याला आता फळ येण्याची वेळ झाली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणार असून राजकारणात कोणी कुणाचा दुश्मन नसतो, कोणी कुणाचा मित्र नसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यात जुळून येतील असा मला विश्वास आहे.
दरम्यान, आता आमची महायुती झाली असून त्यात रामदास कदम हे आमचे नेते झाले आहेत. महायुतीचं वातावरण कोकणात अतिशय चांगलं असून यात मिठाचा खडा फोडू इच्छित नाही. काल अतिशय कट्टर असणारे सुर्यकांत दळवी आणि रामदास कदम एकाच व्यासपीठावर होते. असेही त्यांनी आर्वजून सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा