धाराशिव : ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो होतो. पण विकास पुरूष नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत. राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असले पाहिजे. यापूर्वी तुम्ही अर्चना पाटील यांचे सासरे यांना निवडून दिले होते. आता सुनेची वेळ आली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी ‘सून ही घरातली असते, काही लोक तिला बाहेरची समजतात’, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनाही टोला लगावला.
हेही वाचा…Live Ajit Pawar | अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवार धाराशिवमध्ये, लाईव्ह सभा
धाराशिव लोकसभा निवडणुकीतील धाराशिव मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंग पाटील, मंत्री तानाजी सावंत, आमदार विक्रम काळे, सुरेश बिराजदार इत्यादी नेते उपस्थितीत होते. त्याआधी या सर्वांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील दिसून आली.
अजित पवार पुढे म्हणाले, निवडणूक गावकी भावकीची नाही तर इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळात 140 कोटी जनतेचा नेता निवडण्याची आहे. जसा घरात कारभारी योग्य असेल तर घर चालतं. घरात आर्थिक सुबत्ता, सुख, शांती नांदते. तसंच हा भारत देश आपलं घर आहे. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचे काम केलं . आज जगात कुठेही गेलं तर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा आणि चांगला असतो. ही किमया केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याला भरघोस निधी दिला आहे. कोणत्याही राज्यामध्ये जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्यामध्ये अर्धा हिस्सा हा केंद्राचा असतो आणि निम्मा हा राज्याचा असतो. त्यामुळे जे दीडशे दोनशे कोटीचे प्रोजेक्ट प्रत्येक राज्यात झालेले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे झाल्याचे दिसते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नवीन तीन कोटी लोकांना घर बांधून देण्याचा कार्यक्रम दिला आहे. यापूर्वी आदिवासी मागास समाजातील जनतेला घर मिळायची. मात्र माझा भटका विमुक्त, अल्पसंख्यांक, मागास वर्गातील गरीब यांना सुद्धा या योजनेअंतर्गत घर मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही काम करतात ते मागचा पुढचा विचार करून करतात. आगामी काळात मोदी सरकार आले तर 300 युनिट पर्यंत ज्यांचा विज बिल येतं त्यांना वीज मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म
हेही वाचा…आढळराव पाटलांना खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
हेही वाचा..“पाच वर्षानंतर आताच माझी आठवण झाली का ?” माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर