पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केलीय. यातच प्रचारा दरम्यान नारायणगाव दौऱ्याच्यावेळी त्यांची गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढली. यावेळी शिवजन्मभूमी पुत्र म्हणून कोल्हेंना लोकसभेत पाठवण्यासाठी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यावरूनच आता आढळरावांनी कोल्हेंचा चिमटा काढला आहे.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, कोणतीही निवडणुक म्हटली की ती गावकी-भावकीभोवती फिरत असतो. मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा अन्य पातळ्यांवर होऊ नये. यासाठी काही नेते आग्रही आहेत. निवडून येण्याच्या मेरिटवर जसे तिकीट मिळत आहे. तसेच काम करण्याची क्षमात ओळखून मतदान करण्याचे आवाहन करताना नेते दिसत आहेत. यातूनच ही लोकसभेची निवडणुक गावकी भावकीची नसून देशाच्या भवितव्य ठरवणारी असल्याचे मत आढळरावांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा…कॉंग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय. मोहोळांचा घणाघात
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आगामी पाच वर्षाच्या काळात देशाचा नेता हा जागतिक पातळीवर आपल्या देशाला कुठे नेऊन ठेवतो. आपली अर्थव्यवस्था कितव्या क्रमाकांवर येईल याचा विचार करतो. त्यामुळे तुम्ही मतदान करतांना विचापुर्वकर करा. कारण ही निवडणुक गावकी भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म
हेही वाचा…आढळराव पाटलांना खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
हेही वाचा..“पाच वर्षानंतर आताच माझी आठवण झाली का ?” माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर
हेही वाचा…Live Ajit Pawar | अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवार धाराशिवमध्ये, लाईव्ह सभा