मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहित महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टी यांनी हे खरमरीत पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील नेते तुमचं ऐकत नाहीत का?, असा बोचरा सवालही शेट्टी यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.
चंद्रकांतदादांनी सोमय्यांच्या प्रकरणात पडू नये, अन्यथा त्यांचेही कपडे फाटतील – राऊत
राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला माहिती असेल की 2013 मध्ये जंतर मंतरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा पाटकर, उल्का महाजन आणि इतर अनेक शेतकरी संघटनांनी भूसंपादन आणि इतर समस्यांबाबत आंदोलन सुरू केले होते. सोनियाजींनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जयराम रमेश यांना प्रश्न सोडवण्यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. यूपीएने सर्व राजकीय पक्षांशी समन्वय साधून देशासाठी भूसंपादन धोरण तयार केले. जे खरोखरच ऐतिहासिक ठरले.
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
शेट्टी यांनी म्हटलं आहे की, विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यासाठी संपादित करायच्या होत्या त्यांच्या जगण्यासाठी हे धोरण योग्य होते.पण 2015 मध्ये अदानी आणि अंबानींच्या दबावाखाली मोदीजी आणि त्यांचे सरकार यूपीए सरकारने केलेले अधिग्रहण धोरण बदलू इच्छित होते.या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना विविध शेतकरी संघटनांसह मोदीजी सरकारने सुचवलेल्या बदलांना विरोध केले. त्यावेळी तुम्ही लोकसभेत माझ्यासोबत हा मुद्दा उपस्थित केला व बदलांना विरोध करून आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण मोदीजींनी एक युक्ती खेळली आणि या बदलांचा चेंडू राज्याच्या कोर्टात टाकला.
प्रिय साथी @RahulGandhi २०१३ मे काँग्रेस ने बनाये हुये भुमिअधिग्रहण कानून मे २०१५ को मोदी सरकार संशोधन करके बदलाव लानेवाले थे ! तब आपकी सरकार देशके किसानोंके साथ रहकर इस संशोधन को विरोध किया, लेकीन महाराष्ट्र के महाविकास गटबंधन सरकारने इस कानून मे संशोधन करके किसान विरोधी pic.twitter.com/7gxDoLU3MA
— Raju Shetti (@rajushetti) February 17, 2022
शेट्टी यांनी म्हटलं आहे की, दुर्दैवाने महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षस्थानी आहेत हे सरकार या युक्तीचा बळी ठरले व शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा आपल्यापैकी काहींचा वाईट हेतू आहे हे सिध्द झाले, असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
- हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
- पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल
- पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
- २५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ