परभणी : मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहे. तर अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. याचाच फटका निवडणुक आयोगाला बसला आहे. एका जागेसाठी पिंपळगाव येथील पोटनिवडणुकीसाठी निवडणुक होणार होती, मात्र या निवडणुकीसाठी तब्बल १५५ महिलांनी अर्ज केल्याने निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याची चर्चा आता सर्वदूर पोहचली आहे.
हेही वाचा…“आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला झोपू देणार नाही”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथे एका जागेसाठी पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र या निवडणुकीसाठी तब्बल १५५ महिलांनी अर्ज केल्याने निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण एका बॅलेट मशीनवर १४ उमेदवार असतात. अशा चार बॅलेट मशीन मतदान केंद्रावर लावू शकतो. मात्र १५५ उमेदवारांसाठी बॅलेट मशीन लावू शकत नसल्याचं म्हणत निवडणुक आयोगाने जिल्ह्याध्यक्षांना पत्र पाठवून निवडणुक रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंनी दिला मोठा पुरावा,” कारवाई करण्याची केली फडणवीसांकडे मागणी
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. परंतु या गावात अशा पद्धतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने याची चर्चा सुरू आहे. यातच मराठा समाजाला आरक्षण दिला नाही तर येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत देखील अशा पद्धतीने अर्ज सादर करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“डायमंड उद्योग होतोय साफ, कुठं लपून बसलेत एक फुल दोन हाफ”, पटोलेंची जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणात नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांनी पाठवलं समन्स
हेही वाचा…“बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीमत्वास मुकलो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे