IMPIMP

… तरी ती निवडून येणार नाही , बच्चू कडूंनी उडवली कंगनाची खिल्ली

 मुंबई :   अभिनेत्री  कंगना रानौतवर  सध्या देशातल राजकारण चांगलेच तापले आहे. कंगनाची  राज्य सरकारवर  टीकेची  मालिका  अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.  आता  मंत्री बच्चू कडू यांनी  कंगनाची खिल्ली  उडवली आहे
 

 ‘कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ‘असं त्यांनी म्हटलं आहे.  एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला फटकारत राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्न नाही, कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसलाय असं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान कंगनाच्या वादावर अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी भाष्य केलं,’चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असं सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांनी केला.