मुंबई : महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीत गेल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सुरूवातीपासून कॅबिनेटपदासाठी आग्रही राहिल्यानंतर अजित पवारांच्या एंट्रीनंतर बच्चू कडूंनी काहीसं नमतं घेतलं. परंतु त्यांच्या नाराजीची चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. यावरूनच आता महायुतीत कधी पर्यंत राहणार? याबाबत बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं
महायुतीत आल्यानंतर बच्चू कडू यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या आहेत. प्रसंगी कधी कधी तर त्यांनी राज्य सरकारवर देखील मोठी टिका केली आहे. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावर बोलतांना ते म्हणाले की, त्यासाठी सरकारवर टिका-टिप्पणी, नाराजी वगैरे सगळं करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…एकाने आमदारकीसाठी तर दुसऱ्याने खासदारकीसाठी पक्षाला ठोकला रामराम..! पवार अन् संजोग वाघेरेंमुळे ठाकरेंना मिळालं बळ
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमचा पक्ष आहे. पक्षाचं भलं कुठे होत आहे. त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल. तो आमचा राजकीय सोबती असेल. जर सरकारमधून बाहेर पडायची वेळ आलीच , तर कोणत्या जागांसाठी आग्रह धरणार यावर ते म्हणाले की, आम्ही एक दोन जागेसाठी काही करणार नाही. केलं तर तीन -चार जागा घेऊनच महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करू. नाही तर तसं काही करण्यात अर्थ नाही. आणि निवड अमरावतीत का ? अनेक मतदारसं आहेत. वर्धा, यवतमाळ आणि जळगाव देखील आमच्यासाठी अनुकूल असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचालोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा
हेही वाचाअजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद