अमृतसर : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पंजाब आणि हरियाणात जागोजागी रास्ता रोको करण्यात येत आहेत. अशातच उद्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहेत. ते येथे ट्रॅक्टर रॅली आयोजित करणार असल्याचीही माहिती आहे.
‘पंजाबमध्ये उद्या राहुल गांधीजी नाटकबाजी करण्यासाठी येणार आहेत. मुळात या कृषी विधेयकांची चर्चा प्रथम काँग्रेसच्या राजवटीतच सुरु झाली होती. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते सत्तेत आल्यानंतर खासगी कृषी बाजारपेठा उभारू असं आश्वासन दिल होत.’ अशी टीका बादल यांनी केली.
दरम्यान मोदी सरकारच्या तीन कृषी विधेयकांचा निषेध म्हणून अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते.
Read Also:
“पीडितेच्या कुटुंबीयांना भयंकर त्रास कुणाच्या आदेशावर देण्यात आला? प्रियांका गांधींचा योगी आदित्यनाथांवर निशाना https://t.co/APRc3bZ9iZ #HathrasCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020