मुंबई : देशात जिथे भाजप सरकार तिथे दलित महिला आणि अल्पसंख्यांकावर अत्याचार ही सद्यस्थिती असल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी केली. भाजपशासित राज्यांमध्ये महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे.
भाजपाशासित राज्यांमध्ये महिला, दलित आणि अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत, असा आरोपही थोरात यांनी केला. भाजपशासित राज्यांमधील महिला आणि दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेसच्यावतीने आज महिला, दलित अधिकार दिवस पाळण्यात आला. चैत्यभूमी दादर येथे बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात सत्तेवर आल्यापासून महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संघाच्या इशा-यावर चालणा-या केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजप सरकारे महिला, दलित आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने केला.
Read Also :
“पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं”; अर्णब यांना भेटायला किरीट सोमय्या अलिबागला पोहोचले