अलिबाग – रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून अलिबागला नेलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर टीका करत आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, “आपण अर्णब गोस्वामी यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, पोलीस कशा पद्धतीने दादागिरी करत आहेत हे पाहण्यासाठी आलो होतो. फक्त पाहत होतो तर पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रात कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे. पत्रकारांना जेलमध्य पाठवण्याची ठाकरे सरकारची मोहीम चालवली आहे ही आणीबाणीची आठवण करुन देत असून त्याचा निषेध करतो”.