पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार कालपासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गुंजवणीच्या पाण्यासोबत पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात आय. टी. पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात किंचितशीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी यावेळी नागरिकांना दिली.
हेही वाचा…ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरंदर सारख्या पुण्यालगत वसलेल्या तालुक्यातील अनेक गावात समस्या आजही कायम आहेत. त्या सोडवण्यासाठी कटिबध्द असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं. तर तुमच्याकडून आम्हाला खूप आशा आहेत. असं उपस्थित ग्रामस्थांनी सुनेत्रा पवारांना सांगितलं. त्यावर सर्व तुमचे प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द असून तो मी पाळणारच, असेही सुनेत्रा पवारांना सांगितलं.
गुंजवणीच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्रश्ना सोबत इतर प्रश्र्नी केंद्र शासनाकडे ताकदीने प्रयत्न करेन, अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवारांनी नागरिकांना दिली. तर यावेळी बोलताना बाबाराजे जाधवराव म्हणाले, मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. त्या स्वभावाला स्मरून सांगतो, की महायुतीला पुरंदरमध्ये प्रचंड मताधिक्य मिळेलच शिवाय संपूर्ण लोकसभा मतदारसंघात घड्याळ विक्रमी मताधिक्याने विजयी होईल.
माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी यावेळी बोलताना, पुरंदर आता नवीन पुणे होण्याच्या मार्गावर असून त्याला गती देण्यासाठी महायुतीला बळ द्यावे. आपलं नाणं खणखणीत असल्याने दिवसेंदिवस आपला विजय विक्रमी मताधिक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“अगोदर काय घडले हे विसरुन जा अन् उद्याचा उष:काल येण्यासाठी..,” तटकरेंनी केलं मोठं आवाहन
हेही वाचा….“आपल्या भागात विकास निधी खेचून आणण्यासाठी महायुतीला साथ द्या”, अर्चना पाटलांचं आवाहन
हेही वाचा….“पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची माझी तयारी”