अहमदनगर : भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या नेहमीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून संबोधल्या जातात. मुंडे समर्थकांकडून त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटलं जातं. आता, त्याच विधानावरुन भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना, मी मंत्री शब्दाच्या अगोदर मुख्य लावत नाही. कारण, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको, असे म्हटले. सुजय विखे यांच्या या भाषणाची सोशल मीडिया आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती – चंद्रकांत पाटील
पाथर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण. मला काही फरक पडत नाही, कारण मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले. विखेंच्या बोलण्याचा रोक नेमका कोणाकडे होता, अशी चर्चा आता रंगली आहे.
अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काय चर्चा झाली?
पंकजा मुंडे या आमच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत, असं आमदार मोनिका राधळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, भाषणा करताना खासदार सुजय विखे यांनी पंकजा मुडेंमुळेच आपण खासदार असल्याचं म्हटलं. तुम्ही माझ्या प्रचाराला आलात आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झालो. मी जेव्हा ताईंकडे गेलो होतो, तेव्हा मला एबी फॉर्मही मिळाला नव्हता. फक्त माझा भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी, ताईंनी मला विश्वास दिला, तू माझ्या भावासारखा आहे, असं त्या म्हणाल्या. आता, तुमच्या भावाने कॅम्प राबवून 38 हजार लाभार्थी या जिल्ह्यात तयार केले आहेत.
Read Also :
- मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील
- त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावतीतील हिंसाचारावर फडणवीसांचा संताप
- अमरावतीत 144 कलम लागू; आंदोलकांनी टपरी जाळली, दंगानियंत्रक पथके तैनात
- त्रिपुरातील घटनेची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही; हिंसक आंदोलनावरून प्रविण दरेकर आक्रमक
- एसटी आंदोलनात आता अण्णा हजारेंची उडी; पाठींबा देत म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…