अहमदनगर : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली आहे.
ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा; भाजप नेते नितेश राणेंची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देत, त्यावर चर्चा केली. ती ऐकून घेतल्यानंतर हजारे म्हणाले, सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडले पाहिजे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी कर्मचाऱ्यांना बजावले.
धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील विरोध पक्ष भारतीय जनता पक्षाने संपाला पाठिंबा देत त्यामध्ये सहभागही घेतला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. आपल्या संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर हजारे यांनी मागण्यांशी सहमती दर्शवत आंदोलनासंबंधी सल्ला दिला.
Read Also :
- अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काय चर्चा झाली?
- बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती – चंद्रकांत पाटील
- अमरावती शहर बंदला हिंसक वळण; जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड
- एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय, महाविकास आघाडी सरकारच्या निर्दयतेचा कळस – चंद्रकांत पाटील
- सदाभाऊ आणि पडळकरांनी लोकांना वेठीस धरले, वेळ आल्यावर त्यांनाही बघू; अनिल परबांचा इशारा