मावळ : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी बंदचे आवाहन करत धरणे आंदोलन केले. आज सुरु असलेल्या हिंसाचाराला हिंसक वळण आलं आहे. दगडफेक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. हिंसक मोर्चानंतर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आज मालेगाव, नांदेड आणि परभणी येथे संपाला हिंसक वळण आले. तर त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी: रक्तदान करून आंदोलन सुरूच
दरेकर म्हणाले, त्रिपुरा मध्ये घटना झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होता काम नये. महाराष्ट्रातील शांतता भंग करणार असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यावर कारवाई करावी. जातीय तेढ जर निर्माण होत असेल तर ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. अशा प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडत असेल आणि इथे दादागिरी होत असेल तर चालणार नाही. खपवून घेणार नाही. सरकारने यात लक्ष घालावे अशी मागावी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर कंगना राणावतच्या वक्तव्याविषयी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले देशाविषयी, स्वातंत्र्या विषयी आणि स्वातंत्र्य सैनिकांविषयी कंगना राणावत असो किंवा कोणीही असो जर बोललं असेल तर ते चुकीचं आहे. अस बोलू नये, असं यावेळी दरेकर म्हणाले आहेत.
सदाभाऊ आणि पडळकरांनी लोकांना वेठीस धरले, वेळ आल्यावर त्यांनाही बघू; अनिल परबांचा इशारा
दरम्यान मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली. भिवंडीतही काल मुस्लिम समाजानं बंद पुकारला होता. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.
Read Also :
- एसटी आंदोलनात आता अण्णा हजारेंची उडी; पाठींबा देत म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…
- अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काय चर्चा झाली?
- बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती – चंद्रकांत पाटील
- अमरावती शहर बंदला हिंसक वळण; जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड
- एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय, महाविकास आघाडी सरकारच्या निर्दयतेचा कळस – चंद्रकांत पाटील