नागपूर : शिवसेना पक्ष फुट प्रकरणाला आता दोन वर्ष होत येतील, तरी ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमधील वैर काही संपेना. यामध्ये शिंदे गटातील आमदार भरत गोगावले नेहमी चर्चेत राहिले आहेत. त्यातच आता भरत गोगावले यांनी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चांगलाचं खडसावलं आहे.
हेही वाचा…मोदी हटावचा नारा, जागावाटपाबाबत चर्चा ; इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक
आजच्या परिस्थितीवर बाळासाहेबांना काय वाटलं असतं ? असा साधा प्रश्न पत्रकारांनी भरत गोगावले यांना विचारला. त्यावर ते आता वरती जाऊन विचारवं लागेल. आज बाळासाहेबांच्या भावना काय असत्या नेमक्या ? त्यावर ते आता वरती जाऊन विचारावं लागेल. तुझ्यासारखा कोणतीतरी पाठवतो आणि विचारतो. असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सध्या प्रंचड व्हायरल होत असून त्यावर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…१४१ खासदारांचं निलंबन ;सुळे आणि कोल्हेंचं निलंबन, अनिल देशमुखांची केंद्र सरकारवर जहरी टिका
दरम्यान, भरत गोगावले यांच्या प्रतिक्रियेचा अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यावर दानवे म्हणाले की, विचारून बघा, कमरते कशी लाथ बसते. बाजारातील आयोडेक्सच्या बाटल्या अन् मूव्हच्या ट्युब संपतील, पण तुमचं दुखणं क्षमायचं नाही. ज्या ताटात खातात. त्यात मोठं छिद्र करणारे लोक तुम्ही, बुद्धी पण गुवाहाटीला सोडून आल्यावर असेच शब्द तुमच्या तोंडातून निघणार. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
विचारून बघा, कमरेत कशी लाथ बसते! बाजारातील आयोडेक्सच्या बाटल्या अन मूव्हच्या ट्यूब संपतील, पण तुमचं दुखणं क्षमायचं नाही! ज्या ताटात खातात त्यात मोठं छिद्र करणारे लोक तुम्ही, बुद्धी पण गुवाहाटीला सोडून आल्यावर असेच शब्द निघणार तोंडातून.. https://t.co/QdCDrtIOAO
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी १४१ खासदार निलंबित”
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा विषय फेब्रुवारीपर्यंत लांबला ; विशेष अधिवेशन होणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…“तर 2024 ला मी मुख्यमंत्री होऊ शकतो”, बच्चू कडूंच्या दाव्याने अनेकांची उडाली भंबेरी
हेही वाचा…मराठा आरक्षणाच्या विषयासाठी एकूण ३० बैठका ; मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
हेही वाचा…मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन ; आतापर्यंत सरकारने काय काम केलं ?