बीड : बीडमध्ये घडलेली घटना भयावह होती. घराला आग लागली तेव्ही मी माझ्या कुटुंबासह बीडच्या घरी होतो. आधी दगडफेक झाली, त्यानंतर घराला आग लावण्यात आली. अंगणातल्या गाड्या जाळल्या. शेकडो तरूण पोरं जमावात होती. अचानक हल्ला झाल्याने आम्ही गोंधळून गेलो होतो. या घटनेत माझं कुटुंब सावरलं नाही. माझी मुलगी दहशतीत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांनी दिली.
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिसंक वळण लागलं. यामध्ये आंदोलकांने राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आणि गाड्यांना आग लावली. त्यावेळी सोळंके यांचे कुटुंब घरातच होते. या घटनेबाबत जयसिंह सोळंके यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
दरम्यान, मराठा आंदोलकांनी माझा जीव वाचवला. या घटनेसाठी मराठा आंदोलकांना अजिबात दोषी धरत नाही. जमाव मोठा असल्यानं पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसेल. असं प्रकाश सोळंकेनी म्हटलंय. जाळपोळ रोखण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरलं का ? या प्रश्नावर सोळंके म्हणाले की, त्याठिकाणी ५ ते ६ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जमावापुढे काय करणार ? पोलिसांनी लाठीहल्ला, हवेत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या असत्या. पण जमावावर कारवाई केली नसती. तर चिथावणी दिल्यासारखं होईल. म्हणून पोलिसांनी कारवाई केली नसेल असंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा