मुंबई : महाराष्ट्र सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण म्हणत टिका केली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडून राजकारण केले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव अत्यंत खेदजनक आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, किमान सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. जत सारखे तालुके जिथे मोठा दुष्काळ आहे, तालुक्यात टँकर सुरू असून पाण्याची प्रचंड टंचाई आहे. पण यासारख्या अनेक तालुक्यांना डावलून सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण
40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे.शेतकऱ्यांच काय होईल ते होईल… पण मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार खुश असले पाहिजे असच सरकारच्या निर्णयावरून दिसतंय.
दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार हे…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या