नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प केल्याचं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. याआधी अनेकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यातच आता मी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो. असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
हेही वाचा…“वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात”, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू सातत्याने चर्चेत राहत आहेत. यातच त्यांच्या विधानाने आता सगळ्यांचीच भंबेरी उडवली आहे. बच्चू कडू म्हणाले की, माझे सात ते आठ आमदार निवडून आल्यास मी मुख्यमंत्री होऊ शकतो. देशात एच.डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो. असं विधान बच्च कडू यांनी केले आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली”, कुणी केली टिका ?
दरम्यान, महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय गणितं बदललीत. त्यानंतर २०२४ ला आमचाच मुख्यमंत्री होईल. असा दावा महायुती तसेच इतर पक्षातील नेत्यांकडून केला जातोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी याआधी अजित पवारांना तर भाजपने देवेंद्र फडणवीसांना तर शिंदे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यात आता बच्चू कडू यांची भर पडली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाच्या विषयासाठी एकूण ३० बैठका ; मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
हेही वाचा…मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन ; आतापर्यंत सरकारने काय काम केलं ?
हेही वाचा…मोदी हटावचा नारा, जागावाटपाबाबत चर्चा ; इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक
हेही वाचा…१४१ खासदारांचं निलंबन ;सुळे आणि कोल्हेंचं निलंबन, अनिल देशमुखांची केंद्र सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…सुप्रिया सुळे लोकसभेतून निलंबित ; लोकसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय