मुंबई : आभार मानायची वेळ मला आयुष्यात उद्धव ठाकरे यांनी कधीच दिली नाही. किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानपासून मोठा झाला. त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जी आता त्यांच्यावर आली आहे. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. त्यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींनाच का दिला गेला ? टाटांसारखी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली कंपनी आहे, इतर चांगल्या कंपन्या आहेत, त्यांना बाजूला सारून अदानीच का? ही राजसाहेबांची भूमिका आहे. असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
दरम्यान, उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याकाळात त्यांना काही भरीव करता आलं नाही म्हणून ते प्रत्येक गोष्टीला आता कोव्हीडचं कारण देत आहेत. विषय धारावी पुनर्विकासाचा असो की मराठा आरक्षणाचा, अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर हे प्रश्न का नाही सोडवलेत? आता कसली टीका करताय? असा सवालही त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली”, कुणी केली टिका ?
हेही वाचा…“उगीच मी हुडी, गॉगल घालून फिरत नाही”, ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा कार्यकर्ता, जरांगेंसोबतही चांगले संबंध,” अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ?
हेही वाचा…“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं